गावाकडे माझ्या बरेच बदल झाले
जुनी म्हातारी सोडून सर्व काही बदलले
"’जुन म्हणजे सोन’ सारे लोक सांगतात..!
नव जगायला मात्र सारे जण बघतात,
गावात आता मोबईल आला,
लांबचा माणूस जवळचा झाला
तासनतास गप्पांचा फड रंगला
कुटुंबातला मात्र संवाद भंगला .!
सायंकाळी देव्ह्रायात दिवा लागायचा
कुटुंबातील प्रत्येकजण शांती मागायचा
घराच्या संस्कारात वाढायचा
आता सारेजण सतत मालिका बघतात
महाभारत साऱ्या घराच करतात
एक मात्र बर झाल,
घरातल भांडण दूर गेल !
किती बदल झाले या
माहितीच्या युगाचे
सहज होऊन गेलं गाव साऱ्या जगाचे !
कधी कधी जुन गाव आठवत,
कातरवेळी मग मन बैचैन करत !
ती गावातील प्रसन्न सकाळ
रानफुलांनी फुललेला माळ..!
गाईच्या दुधाची पांढरी शुभ्र धार,
पोरांच्या पाटीत आईचा मार..!
घरातली भांडण, मायेचा पूर,
कुठ शोधायचा आता हा सूर..!
म्हातारी कोपऱ्यात गप्प बसते,
जुने दिवस आठवून रडते..!
मालिका संपण्याची वाट पाहते.!
---बिपीन जगताप