Type Here to Get Search Results !

निरोप

निरोप

 
घरापासून लांब दूर जाताना
मायेची माणस सोडताना 
डोळ्यांच्या कडा पाणवतात 
आठवणी पुन्हा दाटून येतात !

कित्येक दिवस घालवलेले 
एकमेकांच्या संगतीने 
कित्येक रात्री गेलेल्या 
मनातल्या गुज गोष्टीने !

ते दिवस आता येणार नाहीत पुन्हा 
मनाचा हळवा कोपरा राहील आता सुना 

मुठीत साठवलेल्या वाळूसारखी 
माणस अशी सुटून जातात 
घट्ट पकडण्याच्या नादात 
माणस अशी निघून जातात !

कोणत असं नात असत 
मनाला हुरहुर लावत 
कोणता हे प्रेम असत 
डोळ्यांना ओलं करत !