![]() |
श्री लक्ष्मण कोकाटे |
जगात अनेक लोक चांगली असतात खूप सामाजिक कार्य देखील करतात पण अनेकदा त्यांना वेळेवर शाबासकीची थाप मिळत नाही..समाजाचे सोडा पण कुटुंबातील लोकही साथ देत नाहीत....मात्र जगण्याची लढाई लढताना ते चांगुलपनावरील विश्वास कायम ठेवतात आपले काम अविरत करीत राहतात कोणतीही अपेक्षा न ठेवता .... मात्र......मुंबईतील एक पोस्टमन काका टपाल वाटप करताना अशा लोकांची माहिती घेतात त्यांना जाऊन भेटतात..त्यांना लढण्याचे बळ देतात ..आणि पुरस्कार देऊन सन्मानितही करतात .
मुंबईच्या मुख्य टपाल कार्यालयात पोस्टमन म्हणून कार्यरत असणारे श्री.लक्ष्मण कोकाटे हे काम अविरतपणे गेल्या एकोंतीस वर्षापासून करत आहेत.
आपला लिखाणाचा छंद जोपासावा यासाठी त्यांनी 'अष्टगंध' या नावाचे त्रैमासिक जुलै 1990 ला सुरू केले 'अष्टगंध' ला यंदा 29 वर्ष पूर्ण झाली आहेत.
" शिक्षण घेणारी तीन मुले आणि संपूर्ण कुटुंबाचे पालनपोषण करताना अनेकदा तारांबळ उडते मात्र आपण समाजाचे काही देणे लागतो या उद्देशाने समाजातील चांगल्या लोकांना निवडून त्यांना दरवर्षी पुरस्कार देतो. आज अखेर सर्व क्षेत्रातील शेकडो लोकांना पुरस्कार देऊन गौरव केल्याचे श्री. कोकाटे सांगतात.
स्वामी विवेकानंद म्हणतात समाजातील चांगुलपणावर विश्वास ठेवा, चांगले काम करणार्या लोकांच्या पाठीमागे सक्षमपणे उभे रहा आणि सज्जनांचे संघटन करा म्हणजे समाजातील अपप्रवृत्तींना आपोआपच आळा बसेल. याच उद्देशाने हे कार्य सुरु आहे.
आपल्या आवाक्याबाहेरील काम आपल्या आवडीचे करून दरवर्षी चांगल्या लोकांना निवडणे तसा त्यांचा शोध घेणे आणि त्यांना भेटून त्यांच्या कामाचे कौतुक करणे हे मोठे काम करण्यासाठी मोठे ह्रदय देखील असावे लागते. श्री लक्ष्मण आणि उर्मिला कोकाटे हे दाम्पत्य हे काम अतिशय तळमळीने करीत आहेत.
केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, अनेक आमदार, पत्रकार, आणि खूप अपरिचित असणारी गरीब माणसांना आणि त्यांनी उभ्या केलेल्या विविध संस्थाना या माणसाने मायेची ऊब दिली आहे. त्यांच्यातील चांगुलपनावर शिक्का मारला आहे.
आज पुरस्कारांचाही बाजार होत असताना एक माणूस आपल्या आणि मित्र परिवाराच्या मदतीतून एक नव काम उभ करतो. लोकांना वर्षातून एकत्र करीत त्यांना मायेने भेटतो. पुरस्कार स्वरुपात सन्मानपत्र, स्तृतीचिन्ह आणि चांगल्या समाजहिताच्या कामाची दखल घेत शाल श्रीफळ देतो
समाजात अनेक लोक आहेत आपल्या परीने काम करणारी पण दुसऱ्याने केलेल्या कामाला शाबासकी देणारे खुप कमी आहेत. या वर्षीचा अष्टगंध पुरस्कार येत्या २१ जुलैला दादर मुंबई येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमास यंदा प्रमुख आतिथी म्हणून मलाही बोलवले आहे. पोस्टमन काका त्याच रितसर निमत्रंण देण्यासाठी आले होते. त्यांचे काम आणि त्यांच आगत्यपुर्वक बोलावणे मला भावनिक करुन गेले.
आयुष्यभर पत्र वाटताना या माणसाने समाजातील चांगली माणस शोधली...या त्यांच्या शोधकार्याला सलाम ......!
श्री कोकाटे यांचा फोन 09821438383 आपणही त्यांना शुभेछा द्या.
बिपीन जगताप.