20 मे जागतिक मधमाशा दिनानिमित्त लेख
मधमाशापालन हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा उद्योग आहे. भविष्यात मधाची वाढती मागणी आणि शेती पीक उत्पादनात होणारी मोठी वाढ पाहता या उद्योगात मोठी आर्थिक कमाई करण्याची आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मीतीस वाव आहे.
राज्याची भौगोलिक परिस्थिती पाहता राज्यात किमान अडीच लाख मधमाशांच्या पेट्या वसाहती राहतील आणि यातून लाखो टन मध निर्मिती होऊ शकेल असे अनेक तज्ज्ञांचा अंदाज आहे. सध्य परिस्थितीत केवळ काही हजारो मधपेट्या राज्यात आहेत. आणि या पाळीव वसाहतीतुन दीड लाख किलो एवढे उत्पादन होत आहे.
राज्याला पश्चिम घाटाचे सह्याद्री पर्वताचे मोठे क्षेत्र लाभले आहे जवळपास 12 जिल्हे आणि 63 तालुक्यांचा समावेश यामध्ये होतो पर्यावरण जंगल आणि मधमाशांना उपयुक्त असणारा फुलोरा पश्चिम घाटात मुबलक मिळत आहे. या भागात कोल्हापूर मधील पाटगाव आजरा, भुदरगड, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाटण जावली, वाई या तालुक्यात आजही अनेक लोक मधमाशा पालन या व्यवसायावर अवलंबुन आहेत. जगात मधमाशापालनाला मोठ्या प्रमाणात प्रोत्सहान देण्यात येत आहे. शेती पीक उत्पादनात प्रचंड वाढ करण्याची क्षमता मधमाशामध्ये आहे. शेतकऱ्यांना जास्तीची आर्थिक कमाई करून देणारा हा उद्योग आता लोकप्रिय होत आहे.
जगात मोठ्या प्रमाणात लोकांची जिवनशैली बदलत आहे. जग पुन्हा एकदा आयूर्वेदाकडे झपाट्याने वाटचाल करीत आहे.
बेरोजगार तरुणांचा महिलांचा रोजगाराचा मोठा प्रश्न उभा राहत असताना शेती व शेतीपुरक उद्योग व्यवसांयाना तांत्रिक व यांत्रिक जोड देत शेतीची उत्पादनक्षमता वाढविणे काळाची गरज झाली आहे.
दुग्धउत्पादन, मधमाशापालन, कुकुट्टपालन, वराहपालन,रेशिम उद्योग, इ अनेक उद्योग शेतीपुरक आहेतच मात्र ते मुख्य उद्योग म्हणून करण्यासाठी शेतकऱ्यांनी तसेच बेरोजगारांनी तयारी दर्शवली पाहीजे.
या सगळ्यात मधमाशा पालन हे भविष्याच्या दृष्टीने खुप मोठा व फायदेशीर दिलासा देणारा उद्योग ठरेल असा मला विश्वास आहे.
आरोग्याच्या बाबतीत अतीशय संवेदनशील झालेले लोक भविष्यात मोठ्या प्रमाणात मधाचे सेवन करणार आहेत. मधाचे विक्रमी उत्पादन वाढविण्यासाठी तरुण प्रयोगशिल शेतकऱ्यांनी पुढे येणे आवश्यक आहे.
मधमाशा केवळ मध व मेण एवढेच उत्पादन देत नाहीत तर शेतकऱ्यांच्या शेतपिकउत्पादनात ३५ ते ४०% एवढे उत्पादन देखील वाढवितात.
जगात मधाला प्रचंड मागणी असल्याने निर्यातीलाही मोठा वाव आहे.
मधमाशांमुळे निसर्गाचा समतोल राखला जातो.
मधमाशांचे संवर्धन संरक्षण करण्यासाठी जागतीक स्तरावर २० मे हा दिवस 'जागतिक मधमाशा दिन' म्हणून साजरा केला जात असतो.
मधमाशांच्या संवर्धनासाठी आज आपण पुढे येऊया शेतकरी बेरोजगार तरुण महीलांसाठी हा नमुनेदार उद्योग प्रचंड फायद्याचा ठरणार आहे. राज्य शासन मधमाशा पालनासाठी पन्नास टक्के अनुदान देताना प्रशिक्षण मोफत देत आहे. मध खरेदीची हमीही देत आहे. यातच आता केंद्र शासनाने या उद्योगास हातभार लावला आहे. याचा फायदा घेऊन आपणही मधमाशा संवर्धनातून उद्योजक व्हावे. मधाचे गाव हि नवी संकल्पना राज्यात खादी व ग्रामोद्योग मंडळ राबवित आहे. मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अन्शू सिन्हा यांच्या संकल्पनेतून राज्यातील डोंगराळ व जंगली भागातील गावांची निवड मधाचे गाव म्हणून करण्यात येत आहे. मधू पर्यटन आणि मधमाशी संवर्धन हे उद्देश ठेऊन सुरु झालेली हि लोकचळवळ अनेक गावात पोहचली आहे. मांघर महाबळेश्वर या मधाच्या गावाच्या शुभारंभानंतर आज एक वर्ष पूर्ण होत आहे या एक वर्षात मधमाशा पाहण्यासाठी आणि शुद्ध मध घेण्यासाठी जवळपास एक लाख लोकांनी गावाला भेटी दिल्या गावातील महिला बचत गटांना रोजगार मिळाला आहे. मधमाशी पर्यटनाला चांगली संधी निर्माण झाली आहे. गावातील शेती सेंद्रिय शेती झाली आहे. गावाचे आर्थिक उत्पन्न वाढून अनेक लोकांनी मधमाशी संवर्धन करीत कायमचा रोजगार मिळवला आहे.
मधाचे गाव या संकल्पनेला राज्य शासनाने देखील बळ दिले असून यावर्षीच्या अर्थसंकल्पात मधाच्या गावाला भरघोस निधी दिल्याने मधाचे गाव मोठ्या प्रमाणात मधमाशी संर्वधनासाठी फायदेशीर ठरेल.
- बिपीन जगताप
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (मध उद्योग )
CLICK HERE TO BUY OUR PRODUCTS