आश्विन पौर्णिमा, कोकणातील नवान्न पौर्णिमा, शरद पौर्णिमा अशा अनेक नावांनी कोजागिरी पौर्णिमा ओळखली जाते. पृथ्वीच्या जवळ आलेला भलामोठा चंद्र या दिवशी दिसतो.
चार महिन्याच्या पावसानंतर ढगांच्या आड लपलेला चंद्र आश्विन महिन्यात दिसू लागतो सर्वाना आनंद होतो सृष्टीतील हा चांदोबा पाहण्यासाठी सगळेच आतुर असतात. चंद्राचा शीतल प्रकाश मन प्रसन्न करणारा आहे. आश्विन पौर्णिमेचा चंद्र संपूर्ण कलाकलाने वाढलेला दिसतो. कोजागिरी म्हणजे लक्ष्मीचा जन्म दिवस या दिवशी रात्री बारा वाजता लक्ष्मी येऊन कोण जागृत आहे हे पाहते कोण सजग आहे हे पाहते आणि त्याच्यावर कृपा करते अशी आख्यायिका सांगितली जाते.
निसर्गाचे अविरत चालेले हे चक्र आपल्याला सोबत घेऊन चालेले असते. निसर्गाची अनेक रूपे आपल्याला आनंद उत्साह देत असतात आपणही अगदी मुक्तहस्ताने उधळलेले हे आनंदी क्षण सहज घेतले पाहिजेत.
काळ्या कुट्ट अंधाराला भेदून आपल्या आयुष्यात अशी कोजागिरी येत असते. मोठ्या दुःखाच्या संकटाच्या मागे असा शुभ्र सुखाचा चंद्र असतोच यावर विश्वास ठेवायला पाहिजे. कोजागिरीचा चन्द्र आपल्याला हि शिकवण देतो जो सजग असेल जागृत असेल त्याला कायम शरदाचे चांदणे मिळेल ज्यामध्ये सुख आणि शांती असेल.
कोजागिरी पौर्णिमेला अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते कोकणातील शेतकऱ्यांच्या भाताच्या काढण्या झाल्या घरात धान्याची रास आली कि हि नवान्न पौर्णिमा येते. कोकणात नवान्न पौर्णिमा मोठ्या भक्तिभावाने साजरी करतात.
मसाले दूध म्हणजे पर्वणीच कोजागिरी ला मोठ्या पातेल्यात दूध तापवून तोच प्रसाद दिला जातो. या दुधात कोजागिरीचा चन्द्र डोकावतो आणि आपल्या शीतल चांदण्याचा प्रकाश आपल्याला प्रसाद म्हणून देत असतो.
आपल्या आयुष्यातील काळरात्रीची अमावास्या संपून अशी कोजागिरी येवो याच शुभेच्छा ..!!!
बिपीन जगताप
बिपीन खूप दिवसांनी पुन्हा तुझे सुंदर लिखाण वाचण्यात आले तुझे लिखाण नेहमीच परिपूर्ण असते यात नवनवीन माहितीही मिळते तसेच अलंकृत आणि सुसंस्कृतही असते वाचून खूप छान वाटले आणखी अनेक विषयावर तू तू लिखाण करावेस तुला shubhechha
उत्तर द्याहटवा