Type Here to Get Search Results !

धरणीमाता दिन ..!!


 'हा घात थांबवा 

भूमातेचे तन मन जळते आहे 

हि वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे....!! 

या काव्यपंक्ती जणू वसुंधरेच्या मुखातून निघालेल्या आहेत असेच वाटते ना.... पृथ्वीवरील मानवजात आपल्या स्वार्थापायी पृथ्वीला निसर्गाला ओरबाडून घेत आहे...पण अशा काही संस्था असतात ज्या केवळ एक दिवसापुरता 'धरणीमाता दिन' साजरा करीत नाहीत तर वर्षभर निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत असतात....अशाच संस्थांपैकी एक संस्था आहे ..'एनव्हरॉमेन्टल फोरम ऑफ इंडिया' (EFOI) 

राज्यसभेच्या खासदार सुनेत्रावहिनी पवार यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली एनव्हरॉमेन्टल फोरम ऑफ इंडिया (EFOI) हि संस्था मागील 15 वर्षांपासून निसर्ग संवर्धन आणि संरक्षण या क्षेत्रात भरीव काम करीत आहे. या संस्थेने लाखो झाडांचे रोपन करून ती जगवली आहेत. निसर्गातील पशु पक्षी कीटक यांचा अधिवास कायम ठेवला आहे.धरणीमातेचे हे लोभस रूप कायम ठेवण्याचा हा प्रयत्न अनुकरणीय आहे ....!! 

आज वसुंधरा दिन' हा पृथ्वीच्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि जागृती करण्यासाठी हा दिवस जगभर पाळण्यात येतो. 

'आपला ग्रह आपली शक्ती'  या थीमवर यावर्षी हा दिन साजरा होत आहे.  

आपली पृथ्वी ही सुमारे ४.५० अब्ज वर्षांपूर्वी तयार झाली.

२००९ साली संयुक्त राष्ट्रांनी २२ एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय 'धरणीमाता दिन' म्हणून पाळण्याची घोषणा केली.

पृथ्वीचा समतोल राखणे आणि निसर्गाचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी सामूहिक प्रयत्न अत्यंत आवश्यक आहेत. निसर्गाचे हे लोभसरूप आपल्याला नेहमीच आकर्षित करते म्हणूनच पृथ्वीमाता कायम अशीच देखणी रहावी यासाठी EFOI या संस्थेने केलेले काम अप्रतिम आहे.  हा आपला ग्रह आपली शक्ती आहे यानुसार हि कृती आहे. 

आज बारामतीचे निसर्ग संपन्न हिरवेगार रूप या संस्थेने केलेल्या वृक्षरोपणामुळेच आहे. 

जलसंवर्धन आणि निसर्ग जतन करण्याबाबतची  जनजागृती हि संस्था कायम करीत आहे. 

आदरणीय सुनेत्रा वाहिनी यांनी ज्याप्रमाणे हे कार्य सुरु केले आहे याचे अनुकरण अनेक संस्थांनी लोकांनी केले तर आपली धरणीमाता निसर्ग संपन्न तर राहिलच पण आपल्याला आपल्या जीवनाचे सार्थक झाल्याचे समाधान देखील मिळेल. 

-----

- बिपीन जगताप,

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.