*दिवाळी मांगल्याची ....गोड गोड आठवणींची...!*
दिव्यांची आरास म्हणजे दिवाळी....अंधारातून प्रकाशाकडे जाणे म्हणजे दिवाळी... आनंद आणि मांगल्याच न्हानं म्हणजे दिवाळी... इच्छापुर्तीचा सण म्हणजे दिवाळी..!
काळरात्रीही उद्याचा सुर्य उगवेल अशी आस ठेवून नवतेजाची पणती उजळत ठेवणारी दिवाळी....!
माणसाच मन केवळ भुतकाळातच रमत नाही तर त्याला भविष्यातील मुक्त गगनभरारीच वेड ही असंत म्हणूनच आयुष्यभर आलेल्या कटू गोड आठवणींची मालीका माणसाच्या मनात सतत सुरु असते पण गोड आठवणी मनाला आनंद आणि समाधान देतात म्हणूनच त्या खुप वर्ष टिकूनही राहतात.
यंदाची दिवाळी माझ्यासाठी विशेष आनंद देणारी ठरली....!
ही दिवाळी पाच दिवस पाच आनंदाच्या पणत्या घेऊन आली....!
दिवाळीच्या पहिल्या दिवशी धनत्रयोदशीला उस्मानाबाद कळंब येथील शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी व निराधार महिलांच्या मेळाव्याला उपस्थित राहता आले.
एकाकी जीवन जगताना संसाराचा गाडा हाकताना मुलाबाळांना शिकवण्याची धडपड अचंबीत करणारी आहे.
कितीही संकट आली तरी नियती पुढे हात टेकवायचे नाहीत. जगण्याच्या लढाईत सहजा सहजी हार न मानता लढायचंच आणि जिंकायचही अशा निश्चयाने सुरु असलेल्या या महिलांचा हा प्रवास खुप प्रेरणादाई आहे.
या महिलांमुळे मला पहील्याच दिवशी स्री शक्तीचे दर्शन घडले.
माणसाच्या आयुष्यातील गोड आठवणी नेहमी शाळेच्या भोवती येऊन थांबतात. शाळा, मित्र,शिक्षक, माणसाला आयुष्यभर अनेकदा आठवत राहतात.
रक्ताचे नाते नसले तरी प्रेमाचे आणि हक्काचे नाते मैत्रीत असते. बालपणीचा काळ सुखाचा म्हणताना शाळेचा काळ सुखावाहच वाटतो.
या दिवाळीला सातवी आणि दहावीतला मित्रांचा गोतळवा भेटला...यावेळी आनंदाला उधान आले. बालपणी वर्गातील या वात्रट पोरांचा प्रगल्भ माणसात झालेला प्रवास खुप आवडला...यातील बरेचजण जवळपास वीस वर्षानंतर भेटले.
मागील काही वर्षात फेसबूक,व्हाटसअँप्प आणि इन्स्टाग्राम यामुळे मोठी क्रांती झाली आहे.
या माध्यमातून व्हाँटसअँप ग्रुपद्वारे अनेक जुने मित्र भेटले.
या सगळ्यांच्या माध्यमातून शाळाचं पुन्हा भेटली... सायकल, चिंचा,बोर, नदी, क्षणभरासाठी पुन्हा नव्याने जिवंत झाली...!
माझी आजी ८५ वर्षाची वृद्धा...पंढरीच्या पांडूरंगांची निसीम्म भक्त.. मागील किमान अठ्ठावीस वर्ष वारी करणाऱ्या आजीच्या पायाच्या दुखण्यामुळे यंदा तीला वारीला जाता आले नाही. विठ्ठलाच्या दर्शनाची मनात आस आणि ध्यास घेतलेल्या आजीची इच्छापुर्ती करता आली.
दिवाळीच्या पाडव्याला पंढरीचा पांडूरंगाच्या दर्शनाला तीला घेऊन गेलो. अठ्ठावीस युगे विटेवरी उभा असणाऱ्या विठ्ठल चरणी तीने समाधानाने माथा टेकला...!
आजीच्या विठ्ठल दर्शनानंतर मी तीच्या थकलेल्या पायावर डोक ठेवले....तीच्या डोळ्यातील समाधानाचा आनंदआश्रू माझ्या माथ्यावर पडला...मला त्यातच पांडूरंगाचा हसरा चेहरा दिसला.
सण येतात जातात...रोज येणारे दिवसही संपतात....काळ असा झपाट्याने पुढे जात असताना हे आनंदाचे क्षण आयुष्यच्या संध्याकाळी फार आठवत राहतील.
- *बिपीन जगताप*
Khupach chan lihlay
उत्तर द्याहटवा