पंचमहाभुतांचे स्वास्थ....!
१ आप तेज वायु पृथ्वी व जल या पंचमहाभुतांचे स्वास्थ हे सर्वच जिवांसाठी महत्वपुर्ण आहे.
यासाठी पंचमहाभुतांचे स्वास्थ निरोगी ठेवण्यासाठी खुप महत्वाचे काम करणे आवश्यक आहे.
माणसाच्या प्रत्येक कृती ही या पंचमहाभुतांच्या स्वास्थासाठी खुप गरजेची आहै.
Bipin Jagtap: या साठी माझ्या आयुष्यात अनेक कामे मी करीत राहीलो ज्यामुळे पंचमहाभूताचे स्वास्थ चांगले राहील यासाठी प्रयत्न केला गेला.
जल हेच जीवन असे आपण म्हणतो त्यातही अनेक जीवांना जगण्यासाठी जल अत्यंत आवश्यक आहे.
या जलाचे महत्त्व ओळखुन अनेक कामे जी रोजच्या जीवनात करता येतात ती आम्ही करीत आलो आहोत.
१)जल पाणी शुद्ध रहावे यासाठी मी कधीही या पाण्यात जसे कि प्लस्टीक अथवा तत्सम पदार्थ टाकत नाही.
2)पाणी जेवढे लागेल तेवढेच पितो ते वाया जाणार नाही याची काळजी घेतो.
3)गावागावात जाऊन पाणी बचतीसाठी,हवेतील प्रदुषण होऊ नये यासाठी आम्ही हजारो पथनाट्य केली.
४) आपल्याकडे महाराष्ट्रात किल्ले खुप आहेत आणि या किल्ल्यांवर शिवकालीन पाण्याचे तलाव आहेत जे आज देखील जीवंत आहेत. अनेक पर्यटक येऊन या मध्ये पाण्यात घाण टाकली जाते...गाळ काढला जात नाही पण आपण अनेक तरुणांबरोबर ही शिवकालीन तलाव स्वच्छ व सुंदर केले.उदा. शिवनेरी, सिंहगड,रायगड
५) अनेक गावात जाऊन पाणी वाचवण्यासाठी गावकरी यांच्या समवेत श्रमदान केले.
पाण्याबरोबर माती ही सुद्धा समृद्ध असणे आवश्यक आहे. जी माती उपजाऊ आहे ती माती तशीच समृद्ध असावी यासाठी आपण खुप प्रयत्न केले.
१)सकाळ या वृतपत्रात पत्रकारीता करताना मातीचे आरोग्य संपन्न रहावे यासाठी वाचनीय असे सदर लिहले. २)आजही माती वरील किटकनाशकांचा आणि रसायनांचा भडीमार थांबावा यासाठी अनेक व्याख्याने देत असतो.
३) सेंद्रीय शेती व,मधोत्पादन यासाठी सातत्याने अनेक वर्षापासून,प्रयत्न करीत आहे.
महाबळेश्वर येथे मध संचालनालयाला कार्यरत असताना आपण सेंद्रीय मधोत्पादन सुरु केले ज्याला शेतकरी व ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.लाखो रुपयात विक्री केला जाणारा मध करोडो रुपयापर्यत विकला गेला.
४)माती जिवंत आहे आणि ती समृद्ध व्हावी यासाठीचा हा सारा अट्टहास आहे.
५)मातीची आरोग्यासाठी ? माझ्या आजोबांनी मातीवर (जे तीला काळी आई म्हणायचे ) प्रचंड प्रेम केल,अनेक झाडे लावली . आजही माझ्या गावातील तरुण जन्म मृत्यू सण समारंभ या निमीत्ताने झाडे लावतात व ती जगवतात देखील अशी हजारो झाडे आज जिवंत आहेत.
सुंदर काम! हे जपले पाहिजे आणि वृद्धिंगत झाले पाहिजे!
उत्तर द्याहटवा