अव्यक्त माणसाला व्यक्त करण्यासाठी त्याच्या मनातील भावनेला स्पर्श झाला पाहीजे. विश्वासार्ह मैत्रीपुर्ण संवाद सुप्त भावनांचा निचरा करणारी एक जादूच असते.
डॉ. नामदेव भोसले सहसचिव कौशल्य विकास महाराष्ट्र शासनआयुष्य सुंदर करायचे असेल तर जीवन म्हणजे मज्जाच मज्जा ही संकल्पना दृढ करीत आयुष्याच्या प्रत्येक क्षणांचा आनंद घेणारे... या आनंद सरितेत आपल्या सोबत्यांना चिंब करणारे आणि' लाईफ इज ब्युटीफूल' म्हणत जीवन म्हणजे मज्जाच मज्जाचा आनंद लुटणारे डाँ.नामदेव भोसले आणि टिम घेऊन येत आहे... एक मुक्त विद्यापिठ जे माणसाला माणूसपणाचा आनंद देईल. या हृद्यीचा त्या हृदयी संवाद होईल.
आजूबाजूच्या निसर्गाला निसर्ग म्हणून भेटले की नवी उर्जा प्राप्त होते. उंचच उंच पर्वत रांगा, निळाशार अथांग सागर, आणि क्षितीजापर्यंत पसरलेले वाळवंट सगळेच आनंदाचे अमर्याद साठे आहेत. आकाशाला गवसणी घालणारी ध्येय देखील पुर्ण करण्यासाठी ही निसर्गाची आणि आपल्यातील आनंदाची अपंरपार शक्ती कामी येते.
संवादाचे नाते मनाशी कमी पण हृद्याशी जास्त असते. निसर्गाचा प्रत्येक घटक आपल्याशी संवाद साधतो. भल्या पहाटे सुरु होणारे पक्षांचे कुंजन ते रात्रीच्या गर्भातील रातकिड्यांची किर किर सगळ्यांच जगणं अवर्णनीय आहे. निसर्ग माणसाशी संवाद साधतो मात्र तो संवाद करण्यासाठी माणसाला संवेदनशील मन आणि ह्रदय असावे लागते.हजारो वर्षे माणूस असा माणसांशीच नव्हे तर निसर्गाशी नाते जोडून आहे.
आज समाजातील संवाद हरवत चालला आहे. माणसाला एकमेकांशी बोलण्यासाठी असणारे कट्टे संपत चालले आहेत. जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे येणारे अनुभवाची शिदोरी तशीच पडून आहे. एका बाजूला प्रचंड भौतीक प्रगतीमुळे तो सुखासीन झाला आहे पण संवाद संपल्यामुळे त्याला एकटेपणाच दुःख देत आहे.
आजही मला आठवते आहे प्रत्येक गावातल्या चावडीत माणंस जमायची गप्पांचे फड रंगायचे अनेक वृद्ध तरुणांपुढे अनुभवाची शिदोरी मोकळी करायचे. गावागावात कट्टे होते वडाचे लिंबाचे पार होते. माणसांची मैफील जमायची लोकांची करमणूक व्हायची गप्पागोष्टींत सारी रमून जायाची तसेच काँलेज कट्टे ही प्रसिद्ध होते.शाळा काँलेजची शान होते वर्गापेक्षा या कट्यावरच पोरं जास्त शिकली होती.
आजही माणूस बोलतो पण यंत्राशी, घरात असून घरात नसतो. माणसात असून माणसात नसतो. तो व्यक्त होत नाही.कुंटूंबातील आणि माणसातील हा संवाद हरवणे म्हणजे माणूस संपवणेच आहे. जिंदगीचीसगळी घुसमट झाली आहे. मोबाईल नावाच्या अभासी जगाने त्याचा संवाद हरवला आहे.
माणसाचे मुक्त स्वच्छंदी जगणेच लुप्त होण्याच्या मार्गावर चालले आहे.बोलावे तर कुणाशी कोण आपल ऐकेल ही मोठी भिती त्याच्या मनात निर्माण झाली आहे. संपत चालला हा मुक्त संवाद पुन्हा सुरु करण्यासाठी, प्रत्येकातील सुप्त आनंदाला जागे करण्यासाठी,जीवन म्हणजे आनंदी आनंद...मज्जाच मज्जा करण्यासाठी सज्ज व्हा.
डाँ.नामदेव भोसले व त्यांचे सर्व सहकारी या मुक्त विद्यापिठाच्या प्रागंणात आपणाला नवी आशा देणार आहेत.जगण्याचा नवा मार्आग सांगणार आहेत.
चला तर मग माणसाच्या जीवनातील हे अमुल्य क्षण पुन्हा जगूया,.... सहजीवन सहज संवाद पून्हा साधूया माणसांची नाती पुन्हा नव्याने जोडूयात...!
जीवन सुंदर आहेच पण अजून सुंदर करुयात...!
- बिपीन जगताप
"वाड्यातील नाती"
उत्तर द्याहटवापुणे एक ऐतिहासिक जुने शहर तसेच शिक्षणाचे माहेरघर म्हणुन प्रसिद्ध आहे. तसेच शहराची भौगोलिक रचना व एकंदरीत हवामान त्यामुळे बर्याच लोकांचे पुणे हे आवडते शहर आहे.
सन 1961 पर्यंत पुण्यातील वाडा संस्कृती ही जगप्रसिद्ध होती. सन 1961 मध्ये पुण्यातील मातीचे पानशेत धरण फुटून मोठा महापूर आला होता. त्या मुळे खडकवासला धरणही फोडावे लागले होते, त्याची भिंत आजमितीस पाहायला मिळते. त्यामुळे पुण्यातील जवळपास 3/4 परिसर पूर्णपणे पुराचे पाण्याखाली बुडाल्याने बर्याच वाड्या चि पडझड होऊन फार मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर पुणे शहरातील नागरिकांनी पुन्हा पुणे शहर नव्याने उभे करून औद्योगिक क्षेत्रातही कमालीची प्रगती केली. परंतु तसे करीत असताना वाडा संस्कृती कधी
लोप पावली हे समजलेही नाही, व त्याजागी मोठमोठ्या काँक्रीट इमारती व टोलेजंग टॉवर उभारले गेले. त्यामुळे वाडा संस्कृतीतील "नाती " नाहीशी होऊन त्या जागी टॉवर संस्कृतीतील नात्याने जन्म घेतला.
ह्या दोन नात्यातील फरक व्यक्त करण्याचा छोट्याश्या कवितेच्या माध्यामातून केलेला छोटासा प्रयत्न...
'नाती तेंव्हा ही होती
आणि नाती आत्ताही आहेत '
तेंव्हा...
उन्हाळ्याच्या सुट्टीत भरपूर पाहुण्यांचे आगमन ! वाड्यातील खोली समोरील मोकळ्या जागेत किंवा मधल्या परसात अंथरुणावर एकाच उशीवर दोन दोन डोकी ठेऊन सगळे जण निवांत झोपी जात.
आता...
दोन पाहुणे येणार अशी बातमी कळताच सर्वांचे नित्यक्रम विस्कळित होते व कोण कुठे अँडजस्ट होणार ? यावर चर्चा होते. ||1||
'नाती तेंव्हा ही होती
आणि नाती आत्ताही आहेत '
तेंव्हा...
चूलता, चूलती, आत्या, मावशी इ. चा पूर्ण हक्काने आम्हाला रागावणे किंवा समज देणे आणि आम्ही लहान मुलांनी वडीलधारयानचा मान ठेऊन त्यांच्या रागावण्याचा स्विकार करणे. आता...
हे मोठे लोक आमचा अपमान का करतात? ते आम्हाला असे का बोललात? अशा प्रकारे आपला इगो, तोरा दाखवून मुले नाराज होतात. ||2||
'नाती तेंव्हा ही होती
आणि नाती आत्ताही आहेत '
तेंव्हा...
प्रत्येक साखरपुडा आणि लग्नामध्ये आत्याचे यजमान व जावई यांची नाराजी ठरलेलीच, परंतु सर्वजण एकत्र येऊन त्यांची नाराजी दूर करून, एकमेकांच्या हातात हात घेऊन पुन्हा एकत्र होत असत.
आता...
ज्याने कोणी आमच्यावर राग धरला किंवा नाराज झाला? त्याचे आमचे संबंध संपले! असे म्हणुन आपला इगो, रुबाब दाखवून एकमेकावर कायमचे नाराज hone. ||3||
'नाती तेंव्हा ही होती
आणि नाती आत्ताही आहेत '
तेंव्हा...
सणासुदीला सगळे जण नवीन कपडे परिधान करून तयार होऊन एकमेकांच्या घरी जाऊन, मेवा मिठाईची देवाण घेवाण करून एकत्र बसुन मिठाईचा आस्वाद घेत असू.
आता...
मोबाईल वर आलेले फॉरवर्ड संदेश जो मूळ संदेश नसतानाही आम्ही बंद खोलीत बसुन किमान 500 लोकांना 'हॅप्पी दिवाळी ' चा संदेश पुढे पाठविला ह्यातच संतुष्ट होतो. ||4||
'नाती तेंव्हा ही होती
आणि नाती आत्ताही आहेत '
तेंव्हा...
वाड्यातील एका खना एवढ्या खोलीत क्षमते पेक्षा जास्त लोक मिळून घर बनवुन राहत, स्वैपाकाच्या वेळी ढीगभर भाकऱ्या बनवित. त्यावेळी एखादा वाद झाल्यास थोड्याच वेळात पुन्हा हासत मुखाने एकत्रित होत.
आता...
संपूर्ण इंटेरियर केलेल्या फ्लॅट मध्ये चार प्रतिष्ठित लोक आणि दोन जनरेशन चे अस्तित्व असते. त्यातही छोट्या छोट्या गोष्टीतील भांडणात तासनतास वादविवाद करून कोणी कसे अँडजस्ट करावे या बाबत चर्चा होते. ||5||
'नाती तेंव्हा ही होती
आणि नाती आत्ताही आहेत '
तेंव्हा...
आम्ही नात्या साठी जिवंत असायचो...
आता...
आम्ही नाती निभावून घेत असतो ||6||
'नाती तेंव्हा ही होती
आणि नाती आत्ताही आहेत '
प्रकाश वाणी.
आपण खूप सुंदर लिहिले आहे. नाती संपुष्टात येत असताना नाती जिवंत रहावी म्हणून आपण करीत असलेल्या या विचारांना सलाम
हटवा